‘स्मार्ट मीटर’वरून लोकसभेत गदारोळ – तहलका टाइम्स न्यूज पोर्टल

‘स्मार्ट मीटर’वरून लोकसभेत गदारोळ – तहलका टाइम्स न्यूज पोर्टल



नवी दिल्ली: 2 एप्रिल: स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत वातावरण थोडं तापलं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी स्मार्ट मीटर बसवलेल्या भागातील वीजबिलांमध्ये असाधारण वाढ झाल्याचा आरोप केला. मनीष तिवारी यांनी कनिष्ठ सभागृहाला संबोधित करताना सांगितले की, विशेषत: जेथे वीज क्षेत्राचे खाजगीकरण झाले आहे, तेथे ग्राहकांची बिले 4 पटीने वाढली आहेत, त्यामुळे जनता त्रस्त आहे. स्मार्ट मीटरमध्ये अशी कोणती यंत्रणा बसवली आहे ज्यामुळे वीज बिलात इतकी वाढ होत आहे, असा सवाल त्यांनी केला. “स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी आणि नंतरच्या वीज बिलात किती तफावत आहे, याचा काही अभ्यास मंत्रालयाने केला आहे का?”, असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. बिले खरोखरच एवढी वाढली असतील तर त्याची कारणे शोधून जनतेला दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पक्षाने दावा केला आहे की अनेक भागात ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त बिले भरत आहेत. सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरकार यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्मार्ट मीटरची कार्यक्षमता आणि त्याचा परिणाम यावर व्यापक अभ्यास करण्याची गरज आहे, जेणेकरून सत्य बाहेर येईल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.



Source link

Loading

More From Author

दिल्ली हाईकोर्ट में ANI-OpenAI केस का फैसला सुरक्षित:  ANI ने खबरों के इस्तेमाल का आरोप लगाया, OpenAI बोला- ChatGPT पूरा आर्टिकल कॉपी नहीं करता

दिल्ली हाईकोर्ट में ANI-OpenAI केस का फैसला सुरक्षित: ANI ने खबरों के इस्तेमाल का आरोप लगाया, OpenAI बोला- ChatGPT पूरा आर्टिकल कॉपी नहीं करता

विश्व ऑटिज्म जागरूकता दिवस- दिल्ली का सफदरजंग मकबरा जगमगाया:  दुनिया में चल रहे ‘ लाइट इट अप ब्लू’ के तहत आयोजन, भारत में 2 करोड़ पीड़ित

विश्व ऑटिज्म जागरूकता दिवस- दिल्ली का सफदरजंग मकबरा जगमगाया: दुनिया में चल रहे ‘ लाइट इट अप ब्लू’ के तहत आयोजन, भारत में 2 करोड़ पीड़ित