टी-20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 176 धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलंबोमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
इशान किशनने 40 चेंडूत 77 धावा केल्या तर अभिषेक शर्मा एकही धाव न घेता बाद झाला. भारताच्या वतीने कर्णधार सूर्य कुमार यादवने 29 चेंडूत 32 धावा केल्या, त्याला उस्मान तारिकने बाद केले.
शिवम दुबेने 17 चेंडूत 27 धावा केल्या.
पाकिस्तानच्या वतीने सईम अयुबने चार षटकात 25 धावांत 3 गडी बाद केले. उस्मान तारिकने 4 षटकात 24 धावा देत एक बळी मिळवला. कर्णधार सलमान अली आघाने दोन षटकांत 10 धावा दिल्या तर मोहम्मद नवाजने चार षटकांत 28 धावा दिल्या. शाहीन शाह आफ्रिदीला दोन षटकांत ३१ धावा देत महागात पडली. शादाब खानने एका षटकात १७ तर अबरार अहमदने तीन षटकांत ३८ धावा दिल्या.
![]()

